modi aawas ghakul yojana
modi aawas ghakul yojanaइतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यासाठी ( महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश इतर मागास प्रवर्गासाठी तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे.
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी “मोदी आवास” घरकुल योजना राबविण्यात येत आहे.
१. आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी.
२. आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी.
३. जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी
योजनेचे स्वरुप –
उपरोक्त १,२ व ३ मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी रु. १.२० लक्ष अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात यावे. या योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान २६९ चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील.
- योजने अंतर्गत लाभार्थ्याची निवड वरिल १,२ व ३ मधून उपलब्ध झालेल्या कुटुंबांच्या यादीमधून निवड करण्यात येईल.
- सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी यापूर्वी झाली नसेल अशा लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल.
- ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करण्यात येईल तदनंतर मान्यतेसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात येईल
लाभार्थी पात्रता –
१. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
२. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.
३. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखापेक्षा जास्त नसावे.
४. लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
५. लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
६. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
७. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनःश्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
८. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा
📝 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1) ७/१२ उतारा / मालमत्ता नोंदपत्र / ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र,
2) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत,
३) आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत,
४) रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल
5) मनरेगा जॉब कार्ड
६) लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
🏢 ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
- जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा नगरपालिकेत जाऊन अर्जाचा फॉर्म घ्या.
- आवश्यक माहिती भरून आणि कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करा.
- अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी केली जाईल.
अर्ज download येथे करा
💡 महत्वाच्या टिप्स:
✅ अर्ज भरताना सर्व माहिती योग्य आणि स्पष्ट द्या.
✅ लाभार्थी यादीत नाव आहे का, यासाठी अधिकृत वेबसाईटवर शोध घ्या.
✅ अर्ज झाल्यानंतर त्याचा स्टेटस नियमित तपासा.
🛑 महत्वाची सूचना:
कोणत्याही प्रकारच्या दलालांची किंवा एजंटांची मदत घेऊ नका. अधिकृत पोर्टल किंवा स्थानिक सरकारी कार्यालयातच अर्ज करा.
✅ निष्कर्ष:
मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या किंमतीत घर देण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर वरील पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा आणि सरकारी मदतीचा फायदा घ्या.
✨ आपले मत किंवा अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा! 😊